1.

Write a essay on importance of reading in Marathi​

Answer»

कुठलाही महान व्यक्ती वाचनामुळे महान बनू शकला. हे त्यांच्या आत्मचरित्राचा अभ्यास केल्यानंतर समजते. लहान असल्यापासून आपल्याकडून अक्षर ओळख, वाचन आणि पाठांतर करवून घेतले जाते. एकदा का वाचनाची आवड निर्माण झाली की आपोआपच पूर्ण आयुष्यभर पुस्तकांशी मैत्री होते. वाचनाचा संदर्भ आपल्याला वयानुसार दिला गेला आहे. लहान असताना फक्त अक्षरे, थोडे मोठे झाल्यावर कविता, छान छान गोष्टी तसेच शाळेत जाऊ लागल्यावर पाठ्यपुस्तक आपल्या वाचनात आलेले असते. अशा पाठ्यपुस्तकातून आपल्याला विविध लेखकांची ओळख होते. समाजातील आणि मानवी जीवनातील सर्व पैलू पुस्तकांत मांडलेले असतात. शाळेत असताना ग्रंथालय असणे आवश्यक आहे. शाळेतील पुस्तकांव्यतिरिक्त आपल्याला संपूर्ण जगाचे ज्ञान ग्रंथालयात बसून होत असते. पुस्तक हेच आपले खरे मित्र असतात. पुस्तकांशिवाय शाब्दिक आणि बौद्धिक ज्ञान होणे अशक्य आहे. पूर्ण जगभरात असंख्य तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ, कवी, लेखक, शिक्षक यांची पुस्तके आहेत. प्रत्येक व्यक्तीची जी आवड आहे त्या क्षेत्रातील पुस्तके, ग्रंथ वाचन करणे त्याला फायदेशीर ठरू शकते. एखादा खेळाडू लहान असताना खेळाबरोबर त्या खेळासंबंधित पुस्तके वाचत राहिला तर त्याची खेळाबद्दल समज किती वाढेल, याचा अंदाज आपण लावू शकतो. भारतातील शिक्षण क्षेत्र, सरकारी क्षेत्र, उद्योगी क्षेत्र अशी सर्वच क्षेत्रे हुशार व्यक्तींसाठी आहेत. त्यातील गूढ ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वाचनाची गोडी आवश्यक आहे. चांगले भविष्य घडवण्यासाठी आणि उज्ज्वल कीर्ती मिळवण्यासाठी वाचन आवश्यक आहे. भारतातील सर्व समाजसुधारक, नेते, लेखक वाचनाचे महत्व पटवून देतात. तुम्हाला जी भाषा अवगत असेल त्याद्वारे तुम्ही वाचायला सुरुवात करा. सुरुवातीला कंटाळा वाटेल परंतु सवय झाल्यानंतर तोच कंटाळा दूर होतो आणि फक्त पुस्तक पकडले जाते.



Discussion

No Comment Found